रुडकी, उत्तराखंड: उत्तम साखर कारखान्यात सफाई करणाऱ्या कामगारांवर मशीन कोसळल्याने दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने खासगी वाहनातून मंगलौर येथील सार्वजनिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, कारखान्याचा गळीत हंगाम समाप्त झाला आहे. आता आगामी गळीत हंगामाची तयारी सुरू असून प्रशासनाने देखभाल-दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. बुधवारी दोन कामगार सफाई करत असताना मशीनचा अवजड भाग त्यांच्या अंगावर कोसळला. यात ते गंभीर जखमी झाले. इतर कामगारांनी तातडीने दोघांनाही बाहेर काढून आरोग्य केंद्रात नेले. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. गोपीराम (४२, रा. बालेकी, भगवानपूर) आणि सुरेंद्र (२२, ब्रह्मपूर जट, मंगलौर) अशी त्यांची नावे आहेत. उत्तरीय तपासणी करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याचे इन्स्पेक्टर मनोज कुमार मैनवाल यांनी सांगितले.