ईआयडी पेरीचे इथेनॉल उत्पादन वाढवण्याचे लक्ष्य

चेन्नई : साखर उद्योगात एकूण ५,६१७ कोटी रुपयांच्या व्यवसाय करणारी प्रमुख कंपनी मुरुगप्पा समुहाच्या ई.आई.डी.-पेरी (इंडिया) लिमिटेडच्यावतीने दक्षिण भारतात सहा साखर कारखाने चालवले जातात. कंपनीने आता आपला मोर्चा इथेनॉल उत्पादनाकडे वळवला आहे. हा उद्योग समूह इथेनॉल मिश्रण आणि अन्न पोषण अशा विकसित होत असलेल्या व्यावसायिक क्षेत्रांवर अधिक लक्ष केंद्रित करू इच्छितो. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुथु मुरुगप्पन यांनी दि बिझनेस लाइनसोबत कंपनीच्या विकासात्मक योजना आणि नव्या व्यवसायांबाबत चर्चा केली.

ते म्हणाले की, चालू साखर वर्षात साखरेचे इथेनॉलमध्ये डायव्हर्शन गेल्य़ा वर्षाच्या, २०२१-२२ मधील ३.२ दशलक्ष टनाच्या तुलनेत ४-४.५ दशलक्ष टन होईल असे अनुमान आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याची संधी हे खूप मोठे पाऊल आहे. आणि आम्ही नेहमी या कार्यक्रमाचे स्वागत केले आहे.

याची बहुतांश मागणी ऊसावर आधारित इथेनॉल अथवा ऊसाच्या फीडस्टॉकद्वारे पूर्ण केली जाते. यामध्ये मोलॅसिस आणि सिरप या दोन्हींचा समावेश आहे. ऊसापासून तयार झालेल्या इथेनॉलपासून यापैकी जवळपास ७० कोटी लिटरचे उत्पादन होईल. उर्वरित धान्यावरील आधारित डिस्टलरीपासून मिळणे शक्य आहे.

मुरुगप्पन यांनी सांगितले की, इथेनॉल मिश्रण कार्यक्रमातून उद्योगालाही मदत मिळेल आणि शेतकऱ्यांना ऊस बिले वेळेवर देणे शक्य झाले आहे. आम्ही आमची आसवनी क्षमता सातत्याने वाढवत आहे. आमच्याकडे प्रतीदिन ४७५ किलो लिटर (केएलपीडी) क्षमता आहे. आम्ही जी नवी गुंतवणूक करीत आहोत, त्याची क्षमता पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या सुरुवातीला ६०० केएलपीडीपर्यंत पोहोचेल. या आर्थिक वर्षात आम्ही आमची डिस्टिलरीची क्षमता वाढविण्यासाठी २७५ कोटी रुपयांची गुंतवणूक करू. एका हिश्याचा वापर आम्ही पर्यावरण सुरक्षा मजबूत करण्यासाठी करणार आहोत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here