बीड : जयभवानी सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून साखरेबरोबरच इथेनॉल उत्पादनावर भर दिला जाईल, अशी ग्वाही कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित यांनी दिली. जयभवानी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अमरसिंह पंडित यांची तर व्हाईस चेअरमन पदी भाऊसाहेब नाटकर यांची निवड करण्यात आली. कारखान्याची निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली. यानिमित आयोजित सत्कार समारंभाला उत्तर देताना पंडित म्हणाले, कारखान्याच्या माध्यमातून शेतकरी, सभासद आणि कर्मचाऱ्यांची आर्थिक प्रगती करण्यावर भर दिला जाईल. इथेनॉल उत्पादनाबरोबरच अन्य सह उत्पादन वाढीवर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी नवनिर्वाचित संचालक नारायणराव नवले, गणपतराव नाटकर, साहेबराव चव्हाण, शंकरराव तौर,जगन्नाथ शिंदे, आप्पासाहेब गव्हाणे, श्रीराम आरगडे, संभाजी पवळ, कुमारराव ढाकणे, राजेंद्र वारंगे, विजयकुमार घाडगे, नंदकिशोर गोर्डे आदी उपस्थित होते.