जागतिक अन्न संकटात भारत बनला आशास्थान : आंतरराष्ट्रीय अहवालात महत्त्व अधोरेखित

जागतिक अन्न संकटावर प्रसिद्ध होणाऱ्या आंतरराष्ट्रीय अहवालांमधून भारताचे जागतिक अन्न सुरक्षेसाठीचे नवे महत्त्व अधोरेखित होत आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून वाढलेले जागतिक अन्न संकट मे २०२३ मध्ये चीनमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे गव्हाचे पीक उद्ध्वस्त झाल्याने अधिक आव्हानात्मक बनले आहे. अशा जागतिक अन्न संकटाच्या काळात भारत जगाचे आशास्थान बनला आहे.

याबाबत दैनिक ट्रिब्यूनमध्ये प्रकाशित अर्थतज्ज्ञ जयंतीलाल भंडारी यांच्या लेखानुसार, सध्या चीनमध्ये गव्हाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाल्यामुळे यावर्षी चीनकडूनही मोठ्या प्रमाणात गव्हाची आयात केली जाणार आहे. अशा परिस्थितीत अनेक देश अन्न संकटाचा सामना करण्यासाठी आणि त्यांच्या अन्नसुरक्षेच्या दृष्टीने भारताकडे बघत आहेत. हैदराबाद येथे नुकत्याच झालेल्या जी-२० कृषी मंत्र्यांच्या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगासमोर अन्न सुरक्षेची चिंता निर्माण होत असताना, भारत बॅक टू बेसिक्स आणि मार्च टू या धोरणासह सज्ज आहे. देशाची अन्न सुरक्षा बळकट करतानाच जगाच्या अन्नसुरक्षेलाही भारत मदत करीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सरकारने परिषदेत सांगितले की, कृषी-विविधतेला चालना, कृषी क्षेत्रातील प्रभावी धोरणे, डिजिटल शेती इत्यादींचा लाभ शेतकऱ्यांना मिळत आहे, त्यामुळे देशातअन्नधान्याच्या उत्पादनात झपाट्याने वाढ होत असून अन्न सुरक्षा बळकट होत आहे. या दृष्टिकोनातून, केंद्र सरकारने नुकतीच मंजूर केलेली सहकारी क्षेत्रात जगातील सर्वात मोठी अन्नधान्य साठवण क्षमता निर्माण करण्याची योजना भारताच्याच नव्हे तर जगाच्या अन्नसुरक्षेत मैलाचा दगड ठरेल, अशी अपेक्षा आहे. भारतात, कोरोनाच्या काळात ८० कोटींहून अधिक दुर्बल घटकांना मोफत अन्नधान्य देण्यात आले होते. अन्न सुरक्षा आणि गरिबांचे आर्थिक सक्षमीकरण सुनिश्चित करण्यासाठी जानेवारी २०२३ पासून संपूर्ण वर्षभर मोफत अन्नधान्य वितरित केले जात आहे. देशातील दोन तृतीयांश लोकसंख्येला रेशन प्रणाली अंतर्गत मोफत अन्नधान्य देण्याचा हा उपक्रम जगभरात अधोरेखित होत आहे.

चालू कृषी वर्ष २०२२-२३ मध्ये, अन्नधान्य उत्पादन ३३०५.३४ लाख टन होण्याचा अंदाज आहे. हे देशातील आतापर्यंतचे विक्रमी अन्नधान्य उत्पादन असेल. तांदळाचे एकूण उत्पादन १३५५.४२ लाख टन असल्याचा अंदाज आहे. देशात गव्हाचे उत्पादन ११२७.४३ लाख टन होण्याचा अंदाज आहे. पोषक/भरड धान्याचे उत्पादन अंदाजे ५४७.४८ लाख टन आहे. डाळींचे उत्पादन २७५.०४ लाख टन एवढा अंदाजित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here