देशाच्या काही भागात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वरिष्ठ मंत्री आणि अधिकाऱ्यांशी बोलून परिस्थितीचा आढावा घेतला.
पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले:
“भारताच्या काही भागात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वरिष्ठ मंत्री आणि अधिकाऱ्यांशी बोलून परिस्थितीचा आढावा घेतला. स्थानिक प्रशासन, एनडीआरएफ आणि एसडीआरएफ टीम बाधित लोकांचे कल्याण सुनिश्चित करण्यासाठी काम करत आहेत.”