साखर कारखाना सुरू होण्याची शक्यता वाढल्याने शेतकरी खुश

गोपीगंज : गेल्या अनेक वर्षांपासून औराई येथे बंद असलेला काशी सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने जिल्हा प्रशासनाकडून कारखान्याबाबत अहवाल मागवला आहे, अशी माहिती स्वदेश जागरण मंचचे विभाग कार्यकारिणी सदस्य व भदोही जिल्हा पालक विकास सिंह यांनी दिली. स्वदेश जागरण मंच सातत्याने औराई साखर कारखाना सुरू होण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, औराई येथील काशी सहकारी साखर कारखाना सुरू झाल्यास १३ जिल्ह्यांतील शेतकर्‍यांचे सक्षमीकरण होईल. परिसरातील ५६१ गावांच्या विकासाला गती मिळेल. यासाठी स्वदेशी जागरण मंच सातत्याने प्रयत्न करत आहे असे विकास सिंह यांनी सांगितले. कारखाना सुरू नसल्याने शेतकरी ऊस लागवडीकडे पाठ फिरवत आहेत. साखर कारखाना सुरू होता तोपर्यंत शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती मजबूत होती असे ते म्हणाले.

साखर कारखान्याची अवस्था बिकट आहे. स्वदेशी जागरण मंचने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवलेल्या पत्रावर आणि आयजीआरएसकडे केलेल्या तक्रारीनंतर केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे असे विकास सिंह म्हणाले. समन्वयक मनोजकुमार सिंह, एसएसपीचे राष्ट्रीय अध्यक्ष विभूती नारायण सिंह, संत राधेश्याम उपाध्याय, उमेश सिंह बघेल आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here