उत्तर प्रदेश : १५ मार्चनंतर उसाची लागण न करण्याचा शेतकऱ्यांना सल्ला

हसनपूर लुहारी : मुजफ्फरनगर येथील उत्तर प्रदेश ऊस संशोधन केंद्राच्या माध्यमातून हसनपूर लोहारी येथील झंडा चौकातील धर्मशाळेत ऊस उत्पादक शेतकरी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संशोधकांनी शेतकऱ्यांना ऊस लागवडीविषयी माहिती दिली. मार्च महिन्यानंतर उसाची लागवड करू नये, असा सल्ला यावेळी तज्ज्ञांनी दिला.

चर्चासत्रात कृषी तज्ज्ञ डॉ. रामबरन सिंग, डॉ. अवधेशकुमार डांगा, सुनील कुमार आणि वसंत पुंडीर यांनी ऊस पिकातील लष्करी अळी, तांबेरा अशा विविध किडीचा धोका टाळण्याबाबत मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी १५ मार्चनंतर उसाची लागण करू नये, खूप उशीरा उसाची लागण केल्यास उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले.

ऊस पिकातील नफा वाढवायचा असेल तर कोएल २३८ प्रजातीच्या उसाची लागवड कमी करावी लागेल, असे तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना सांगितले. यापरिसंवादास आर्येश सैनी, सुमित सैनी, रामपाल, अजय कुमार, संजय सैनी, राकेश, बॉबी, राकम सिंग, राधेश्याम, ग्यान सिंग, सुखदेव, कालू, नक्की सिंग आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here