सहारनपूर : साखर कारखाना सुरू होण्याच्या घोषणेने सरकार आनंदले

सहारनपूर : एक दशकाहून अधिक काळापासून बंद असलेले बिडवी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्याची घोषणा कारखाना प्रशासनाने केली आहे. त्यामुळे शेतकरी आनंदीत झाले आहेत. कारखाना सुरू करण्याची घोषणा ही शेतकरी हिताची असून हा आमच्या संघर्षाचा विजय आहे, असे शेतकऱ्यांनी सांगितले.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, शेतकरी हित तथा गो सेवा समितीचे अध्यक्ष बिट्टू नंबरदार यांनी सांगितले की, साखर कारखाना सुरू करण्यासाठी आम्ही सर्वोच्च न्यायालयात एक याचिकाही दाखल केली होती. कारखाना बंद झाल्यानंतर शेतकरी ऊस पुरवठा आणि थकीत बिलांबाबत खूप धास्तावले होते. आता कारखाना प्रशासनाने पुन्हा सकारात्मक प्रयत्न करताना कारखाना सुरू करण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर खुशी आहे. बिडवी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात १२० गावे आहेत. कारखाना सुरू झाल्यास त्याचा लाभ १७ हजार शेतकऱ्यांना होईल, असे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here