आगीत ऊसही जळणार या धास्तीने शेतकऱ्याचा मृत्यू

लातूर : गंगापूर ते भेंडाळा मार्गावर उसाचे पाचट पेटवून दिल्यानंतर रौद्ररूप धारण केलेल्या आगीमुळे शिल्लक उसाला आग लागते की काय या धास्तीने घाबरलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना २० जानेवारी २०२३ रोजी घडली. यात मृत्यू झालेल्या विलास नामदेव जाधव (वय ४५ रा. अब्दलपुर, हल्ली मुक्काम रांजणगाव शेणपुंजी ता. गंगापूर) असे आहे.

जाधव यांची भेंडाळा शिवारात साडेतीन एकर शेतजमीन असून यातील अडीच एकरातील ऊस तोडून गेला होता ऊस तोडणी झाल्यानंतर शेतामध्ये पाचट शिल्लक होते २० तारखेला जाधव यांनी शेतातील पाचट पेटवून दिले. पाचट पेटवल्यानंतर आगीने रौद्र रूप धारण केले आता ही आग शिल्लक उसाला आपले भक्ष्य करते की काय या धास्तीने त्यांना घाम फुटला व ते जागेवर कोसळले उपस्थितांनी त्यांना गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टर आणि तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक फौजदार बी. के. थोरे अधिक तपास करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here