छत्तीसगड : लोकसभा निवडणुका संपताच ऊस दराचा मुद्दा ऐरणीवर

बालोद : छत्तीसगड राज्यातील शेतकऱ्यांकडून लोकसभा निवडणूक संपताच ऊस दराचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. बालोद जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी शुक्रवारी जिल्हा मुख्यालयाच्या नवीन बसस्थानकावर निदर्शने उसाच्या आधारभूत किंमतीत वाढ आणि प्रति क्विंटल २०० रुपये बोनस या मागणीसाठी केली. यावेळी जिल्हाधिकारी इंद्रजित चंद्रवाल यांना निवेदन देण्यात आले. ऊस उत्पादक संघाचे जिल्हाध्यक्ष तेजराम साहू म्हणाले की, कमी दर देवून शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास शेतकरी ऊस पिकापासून दुरावू शकतात.

छगन देशमुख म्हणाले की, भाताची आधारभूत किंमत ३१०० रुपये प्रतिक्विंटल करण्यात आली. विधानसभा निवडणुकीपूर्वीही आम्ही उसाच्या समर्थन मूल्याव्यतिरिक्त २०० किंवा २५० रुपये प्रतिक्विंटल बोनस देण्याची मागणी केली होती. या मागणीसंदर्भात कृषीमंत्री रामविचार नेताम, गृह राज्यमंत्री विजय शर्मा, अर्थमंत्री ओपी चौधरी आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष किरण देव यांची भेट घेतली होती. मात्र ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा कोणताही निर्णय झालेला नाही. यावेळी आंदोलकांनी २०२३-२४ च्या गाळप वर्षापासून २०० रुपये किंवा २५० रुपये प्रती क्विंटल दराने बोनस त्वरित देण्याची मागणी केली. १५ ते २० दिवसांत मागण्या पूर्ण न झाल्यास शेतकरी संघटना चक्का जाम आंदोलन करेल, असे ऊस उत्पादक संघाने सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here