पंजाब : साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी

गुरुदासपूर : राज्यातील एका सरकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीवरून जोरदार वाद रंगला आहे. पणियाड सरकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीबाबत आपचे नेते समशेर सिंग यांनी पत्रकार परिषदेत अनेक प्रश्न उपस्थित केले.

कारखान्याच्या संचालकपदी अपात्र लोकांना नियुक्त करण्यात आले आहे, असा दावा समशेर सिंह यांनी केला. ते म्हणाले की, कारखान्याचे संचालक होण्यासाठी काहीजण मूलभूत अटीही पूर्ण करत नाहीत. सध्याचे अक्षम संचालक मंडळ बरखास्त करून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री भगवंत सिंह मान यांच्या नेतृत्वाखालील पंजाब सरकारकडे मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here