अर्थसंकल्पात कृषी आणि संबंधित क्षेत्रातील संशोधन, विकासासाठी सरकारने १.५२ लाख कोटींची तरतूद केल्याने शेतकऱ्यांची उत्पादकता आणि उत्पन्न वाढेल : तरुण साहनी

नवी दिल्ली : लोकसभेत मंगळवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना कृषी क्षेत्रातील संशोधन आणि विकासाच्या महत्त्वावर भर देताना कृषी आणि संबंधित क्षेत्रांसाठी १.५२ लाख कोटी रुपयांची तरतूद केली. अर्थसंकल्पाचे त्रिवेणी इंजिनिअरिंग अँड इंडस्ट्रीज लिमिटेडने स्वागत केले आहे. त्रिवेणी इंजिनिअरिंग अँड इंडस्ट्रीज लिमिटेडचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तरुण साहनी यांनी अर्थसंकल्पाचे कौतुक केले. ते म्हणाले की, वाढती मागणी आणि हवामान बदलाबाबतच्या वाढत्या चिंतेमुळे, उच्च-उत्पादन देणाऱ्या आणि हवामान-प्रतिबंधक बियाण्यांच्या जातींकडे वळण्याची गरज आहे. सरकारने अर्थसंकल्पात कृषी, उत्पादन आणि ऊर्जा सुरक्षा यासारख्या प्रमुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करून ‘विकसित भारता’साठी व्यापक रोडमॅप तयार केला आहे.

ते म्हणाले, कृषी आणि संबंधित क्षेत्रातील संशोधन तसेच विकासासाठी सरकारने केलेली १.५२ लाख कोटी रुपयांची तरतूद तसेच नैसर्गिक शेती आणि डिजिटल पीक सर्वेक्षणांसह डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांकडे वाटचालीमुळे उत्पादकता आणि उत्पन्न वाढेल, असे आम्हाला वाटते. देशाच्या काही भागात असमान पाऊस आणि लाल सड रोग यासारख्या आव्हानांचा सामना करणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. आणि यामुळे ऊस उत्पादनात लक्षणीय वाढ होईल.तरूण साहनी म्हणाले की, नैसर्गिक शेतीमुळे बायोगॅस क्षेत्राचे आर्थिक आकर्षण वाढण्यास मदत होईल.ऊर्जा क्षेत्रात, सौर, औष्णिक आणि आण्विक यांसारख्या अक्षय ऊर्जा स्रोतांवर सरकारचा भर आहे. ऊर्जा साठवणुकीसाठीच्या स्टोरेज प्रकल्पांवरील आगामी धोरणामुळे अक्षय ऊर्जेचे सहज एकत्रीकरण सुलभ होईल.

साहनी म्हणाले की, सरकारचा हा दृष्टिकोन अक्षय ऊर्जेच्या परिवर्तनशील आणि अधूनमधून येणाऱ्या स्वरूपाला गती देईल. यामुळे स्थिर आणि विश्वासार्ह ऊर्जा पुरवठा सुनिश्चित होईल. याव्यतिरिक्त, क्लायमेट फायनान्स आणि कार्बन क्रेडिट सारख्या साधनांवर वाढीव लक्ष जैव-ऊर्जा क्षेत्राच्या चांगल्या व्यवहार्यतेद्वारे हरित संक्रमणाची गती वाढवेल. साहनी यांनी उत्पादन क्षेत्रात अतिरिक्त रोजगारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सरकारच्या नवीन योजनेचे कौतुक केले. ते म्हणाले. दूरदर्शी रणनीती केवळ रोजगाराच्या संधी निर्माण करणार नाही, तर नवीन प्रतिभेच्या भरतीला प्रोत्साहन देईल, आर्थिक विकासाला गती देईल आणि नवनिर्मितीला प्रोत्साहन देईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here