राजारामबापू कारखाना शेतकऱ्यांच्या खात्यावर ११ कोटी ८४ लाख जमा करणार : अध्यक्ष प्रतीक पाटील

सांगली : राजारामबापू साखर कारखान्याने घेतलेल्या ऐच्छिक ठेवीतील उर्वरित प्रती टन ७२ रुपयांप्रमाणे ११ कोटी ८४ लाख रुपये लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या जयंतीदिनी, एक ऑगस्ट रोजी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केले जाणार आहेत. कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांनी ही घोषणा केली. कारखान्याने २०१४-१५ साली घेतलेल्या प्रती टन १४७ रुपये ऐच्छिक ठेवीपैकी प्रती टन ७५ रुपये नोव्हेंबर २०२३ मध्येच परत देण्यात आले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

साखराळे येथे राजारामबापू साखर कारखान्याच्या गळीत हंगाम २०२४- २५ चे रोलरपूजन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्ष प्रतीक पाटील म्हणाले की, कारखान्याच्या साखराळे युनिटमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील पहिल्या पथदर्शी सौरऊर्जा प्रकल्पाच्या उभारणीचे काम सुरू आहे. हे काम अंतिम टप्प्यात आहे. हा प्रकल्प गळीत हंगाम सुरू होताना कार्यान्वित होणार आहे. ऑफ सीझनची कामे गतीने सुरू आहेत. उपाध्यक्ष विजयराव पाटील, ज्येष्ठ संचालक बाळासाहेब पवार, बांधकाम समितीचे अध्यक्ष कार्तिक पाटील, शेती समितीचे अध्यक्ष विठ्ठल तात्या पाटील, जलसिंचन समितीचे अध्यक्ष प्रदीपकुमार पाटील, कार्यकारी संचालक आर. डी. माहुली, संचालक रघुनाथ जाधव, बबनराव थोटे, दादासाहेब मोरे. प्रतापराव पाटील, मेघा पाटील, शैलेश पाटील, प्रा. डॉ. योजना शिंदे-पाटील, दिलीपराव देसाई, हणमंत माळी आदी उपस्थित होते.

साखर उद्योगाच्या बातम्यांबद्दल अधिक वाचण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here