भारत साखर निर्यातीवर अंकुश ठेवत राहील : मीडिया रिपोर्ट

नवी दिल्ली : देशांतर्गत वापरासाठी पुरेसा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी आणि इथेनॉल उत्पादनाला चालना देण्यासाठी भारत सरकारने साखर निर्यातीवर अंकुश ठेवणार आहे. स्थानिक बाजारपेठेसाठी वाजवी दरात पुरेशी साखर आणि इथेनॉल तयार करण्यासाठी पुरेसा ऊस उपलब्ध आहे, याची सरकारला खात्री करायची आहे, असे ‘ब्लूमबर्ग’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तामध्ये म्हटले आहे.

या घडामोडींशी संबंधित सूत्रांनी ‘ब्लूमबर्ग’शी बोलताना सांगितले की, सध्या निर्यातीला परवानगी देण्याचा प्रश्नच येत नाही. निर्बंध कायम ठेवल्याने स्थानिक साखर कारखान्यांना मोठा फटका बसेल, जे निर्यात निर्बंध शिथिल करण्याची मागणी करत आहे. साखर निर्यात केल्यास जागतिक किमतींना देखील समर्थन मिळेल. सध्या यावर्षी आतापर्यंत सुमारे १२ टक्क्यांनी किमती घसरल्या आहेत. याबाबत ३० सप्टेंबर रोजी हंगामाच्या अखेरीस देशात ९ दशलक्ष टनांपेक्षा जास्त साठा असेल आणि हे देशांतर्गत वापर, निर्यात आणि इथेनॉल मिश्रण कार्यक्रम टिकवून ठेवण्यासाठी पुरेसे असेल, असे ISMA ने गेल्या महिन्यात म्हटले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here