सातारा : खंडाळा कारखान्याच्या भागिदारी कराराची मुदत वाढवल्याने वार्षिक सभेत गोंधळ

सातारा : खंडाळा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष व्ही. जी. पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. कारखान्याच्या भागीदारी कराराची मुदत १८ वर्षांनी वाढवल्याने वार्षिक सभेत आमचा कारखाना आम्हाला कधी मिळणार, असा सवाल उपस्थित करीत विरोधकांनी सत्ताधारी गटाला धारेवर धरले. त्यावेळी सत्ताधारी व विरोधक यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाली. सत्ताधाऱ्यांनी ज्यावेळी कारखान्यावरील कर्ज फिटेल, त्याच दिवशी हा करार संपुष्टात येईल, असे आश्वासन दिले. मात्र विरोधकांचे समाधान झाले नाही. विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी करू नये. भागीदारी ठरावावर सभासदांमधून मतदानाची प्रक्रिया राबवावी व मगच हा निर्णय घ्यावा, अशी मागणी अनिरुद्ध गाढवे यांनी केली.

माजी संचालक धनाजी डेरे म्हणाले की, कारखाना उभारताना सभासद संचालकांनी स्वतःच्या सातबाऱ्यावर कर्ज काढून रक्कम उभी केली. ही रक्कम तत्काळ भरून या सभासदांना कर्जमुक्त करावे. ठेवपावतीचे ९४ लाख रुपये बँक खात्यावर जमा नाहीत त्याचे काय झाले? असा सवाल डॉ. नितीन सावंत यांनी केला. यावर खासदार नितीन पाटील म्हणाले, “कारखाना उभारताना अवास्तव खर्च केल्यानेच किसन वीर कारखाना कर्जबाजारी झाला. परंतु राजकीय कारकीर्द पणाला लावून कारखाना वाचविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहे. ज्या दिवशी थकहमीचे कर्ज फिटेल, त्या दिवशी कारखाना तालुक्याच्या ताब्यात दिला जाईल. किसन वीरचे अध्यक्ष आमदार मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील, उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, उपाध्यक्ष राजेंद्र तांबे, दत्ता ढमाळ, नितीन भरगुडे-पाटील, ज्येष्ठ नेते बकाजीराव पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव, भाजप तालुकाध्यक्ष अनिरुद्ध गाढवे, बंडू ढमाळ आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here