२०२४-२५ हंगाम: १५ फेब्रुवारीपर्यंत ISMA द्वारे भारतातील साखर उत्पादनाचे अपडेट्स

नवी दिल्ली : ISMA (इंडियन शुगर अँड बायोएनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन) ने चालू २०२४-२५ साखर हंगामासाठी साखर उत्पादनाचे आकडे जाहीर केले आहेत. ISMA नुसार, १५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत चालू हंगामात साखर उत्पादन १९७.०३ लाख टनांवर पोहोचले आहे, जे गेल्या वर्षी याच तारखेला २२४.१५ लाख टन उत्पादन झाले होते. या वर्षी कार्यरत कारखान्यांची संख्या ४६० असून गेल्या वर्षी याच तारखेला ५०४ कारखाने सुरु होते.

ISMA ने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, उत्तर प्रदेशमधील गाळपाची सद्यस्थिती गेल्या वर्षीपेक्षा चांगली आहे. सध्या, राज्यात रिकवरीचे प्रमाणदेखील सुधारत आहे. परिणामी, हंगामाच्या पहिल्या सहामाहीत झालेल्या कमी साखरेच्या पुनर्प्राप्तीची अंशतः भरपाई या हंगामाच्या अखेरीस होण्याची अपेक्षा आहे.महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील कारखाने उसाअभावी बंद होऊ लागले आहेत. आतापर्यंत दोन्ही राज्यांमध्ये सुमारे ५८ कारखाने बंद झाले आहेत. गेल्या वर्षी याच कालावधीत २२ कारखाने बंद झाले होते. दक्षिण कर्नाटकातील काही कारखाने जून/जुलै ते सप्टेंबर २०२५ याकाळात विशेष हंगाम सुरू करतील, असेही पत्रकात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here