ओकारा (पाकिस्तान): भारता प्रमाणेच पाकिस्तानातही ऊस थकबाकीचे प्रकरण तापत आहे. ऊस शेतकर्यांना त्यांची ऊसाची थकबाकी न दिल्या संदर्भात झालेल्या कराराचे उल्लंघन करण्याच्या आरोपात येथील एका साखर कारखान्याचे महाप्रबंधकासह दोन अधिकार्यांविरोधात तक्रार दाखल करुन त्यांना ताब्यात घेतले आहे.
ऊस थकबाकी न मिळालेल्या शेतकर्यांच्या एका प्रतिनिधी मंडळाने दीपलपुर चे सहायक आयुक्त खालिद अब्बास सियाल यांची भेट घेतली आणि तक्रार केली की, अद्बुल्ला साखर कारखान्याने 1,152 शेतकर्यांना त्यांचे 17 करोड रुपये अजूनही दिलेले नाही. तसेच कारखान्यावर 6 करोड रुपये सरकारी कर्जही आहे, जे सरकार आणि शेतकरी प्रतिनिधी यांच्यात झालेल्या सामंजस्य करारांतर्गत कारखान्याकडून भागवले केले पाहिजेत. प्रतिनिधीमंडळाने कारखान्यांद्वारा थकबाकी दिली नसल्याच्या मुद्द्यावर त्याला कराराचे उल्लंघन केल्याचे म्हटले आहे.
यानंतर राजस्व विभाग आणि पोलीसांच्या टीमने साखर कारखान्याच्या दोन अधिकार्यांना इफ्तिखार अहमद आणि नदीम गिल यांना ताब्यात घेतले आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.