बांग्लादेशातील पाबना साखर कारखान्याने सुरु झाल्यापासून आजपर्यंत कमावला नाही नफा

ढाका (बांग्ला देश) : बांग्ला देशातील पाबना साखर कारखान्याने सुरु झाल्यापासून आतापर्यंत नफा कमावलेला नाही. हा कारखाना 90 च्या दशकाच्या मध्यात सुरु झाला होता. गेल्या महिन्यात कारखान्याने 575 करोड टका(बांगलादेशचे चलन ) कर्जाबरोबर उपलब्ध हंगामातील उत्पादन सुरु केले.

गेल्या एक दशकात पाबना च्या ईश्‍वर्डी उपजिल्ह्याच्या दशरिया मध्ये स्थित असणार्‍या या कारखान्याच्या उत्पादनाबरोबरच परिसरात उसाच्या शेतीतही 50 टक्के घट झाली आहे. शेतकर्‍यांनी सांगितले की, त्यांना कारखान्यातून योग्य मदत न मिळाल्याने, थकबाकीत भागवण्यात झालेला उशिर आणि भ्रष्टाचारामुळे उसाची शेती करणे कमी केले आहे. तर कारखाना अधिकारी आरोपांचे खंडन करताना म्हणाले की, कारखान्याचे नुकसान थांबवण्यासाठी उत्पन्नामध्ये विविधीकरण केले पाहिजे.

कारखाना व्यवस्थापनाने यावर्षी 82,000 टन उस गाळपाची योजना बनवली आहे आणि त्यांना रिकवरी दर 8 टक्के राहण्याची आशा आहे, म्हणजेच 6,560 टन साखर उत्पादनाचे लक्ष्य आहे. कारखाना व्यवस्थापकीय संचालक अद्बुस सलीम यांनी सांगितले की, कारखान्याला 60 पासून 65 दिवसांपर्यंत चालवण्याचे लक्ष्य ठेवले गेले आहे. कारखान्याची दैनिक गाळप क्षमता 1,500 टन आहे, म्हणजेच 100 दिवसामध्ये जवळपास 15,000 टन साखरेचे उत्पादन केले जावू शकते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here