उत्तर प्रदेशात साखर उत्पादन 124 लाख टन पार

लखनऊ: दोन महिन्यांच्या मोठया लॉकडाउन ने अर्थव्यवस्थेच्या बहुसंख्य इतर क्षेत्राचेही नुकसान झाले आहे, पण तरीही उत्तर प्रदेश साखर उद्योगाने आतापर्यंत साखरेच्या उत्पादनाचे रेकॉर्ड ब्रेक केले आहे. 27 मे पर्यंत राज्यातील साखर कारखान्यांनी 2017-18 साखर हंगामातील 120.45 लाख टनाच्या सर्वोच्च उत्पादनाच्या तुलनेत 124.92 लाख टन साखर उत्पादन केले आहे. गेल्या वर्षी या तारखेला राज्याने 117.68 लाख टन उत्पादन केले होते. ऊस विभाग प्रमुख सचिव संजय भूसरेड्डी यांनी सांगितले की, राज्यात 119 कारखान्यांपैकी  94 कारखान्यांनी गाळप  बंद केले आहे. ते म्हणाले, शेतकरी आमची प्राथमिकता आहेत. यासाठी जोपर्यंत शेतात ऊस आहे, तोपर्यंत कारखान्यांनी गाळप करावे असे निर्देश दिले आहेत.

 या वर्षी उत्तर प्रदेशातील गाळप हंगाम अधिक वाढला आहे. विशेष करुन गुऱ्हाळ बंद झाल्यामुळे ऊसाचा महत्वपूर्ण भाग गाळपासाठी साखर कारखान्यांना पाठवण्यात येत आहे. कोरोनामुळे साखर उद्योगावर मोठा परिणाम झाला आहे.
Audio Player

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here