शेतकर्‍यांना लवकरात लवकर ऊस थकबाकी दिली जावी: भाकियू

हापुड : भारतीय किसान यूनियन च्या मासिक सभे मध्ये शेतकर्‍यांच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली. प्रशासकीय अधिकार्‍यांनी लवकरात लवकर साखर कारखान्यांकडून देय असलेली जवळपास 900 करोड रुपयांची बाकी भागवावी अशी मागणी करण्यात आली. याबाबतचे निवेदन तहसिलदार यांच्याकडे देण्यात आले.

सभेमध्ये वक्त्यांनी सांगितले की, सिम्भावली, ब्रजनाथपूर, मोदीनगर साखर कारखान्यावर शेतकऱ्याचे जवळपास 900 करोड रुपये देय आहेत. शेतकर्‍यांच्या दैनंदिन गरजाही पूर्ण होत नाहीत, पण सरकार आणि जिल्हा प्रशासन याबाबत गंभीर नाही. लवकरात लवकर थकबाकी भागवली जावी. उस शेतकर्‍यांचे पैसे भागवण्यात येईपर्यंत शेतकर्‍यांकडून विजेची बिले वसुल करु नयेत. शेतकर्‍यांची विजे बिले दुरुस्त करावीत. कुचेसर रोड चौपला वर इफ्को चे दुकान बंद आहे. ते सुरु करावे. शेतकर्‍यांना उर्वरकांचा पुरवठा करावा. ग्रामीण क्षेत्रामध्ये निराधार जनावरांना पकडावे. शेतांवर बाइक घेवून जाणार्‍या शेतकर्‍यांचे चालान स्विकारु नये. स्वर्ग आश्रम रोड ते खडखडी, असरा सह अनेक गावांमधील रस्त्यांची दुरुस्ती करावी.

 

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here