अंबाला, हरियाणा : बरारा सब डिवीजन च्या मुलाना परिसरामधून वाहणार्या नकटी नदीला आलेल्या पुरामुळे तांदूळ आणि ऊसाचे संपूर्ण पीक पाण्यात गेले आहे. पुरामुळे जवळपास डझनभर गावात पाणी शिरले आहे, ज्यामुळे ऊसाच्या पीकाचे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली आहे.
नकटी नदीच्या पुरामुळे सेहला, शेरपूर आणि सुलखानी गावांना जोडणारे रस्ते आणि पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ज्या गावांमद्ये पाणी भरले आहे,त्या गावांचा संपर्क तुटला आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.