महाराजगंज: आयपीएल साखर कारखाना सिसवा ने जिल्ह्यातील ऊस शेतकर्यांची तीन करोड 10 लाख रुपयांची थकाबीक भागवली आहे. यामुळे जवळपास 350 शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे, तर अजूनही कारखान्यावर 16 करोड रुपये देय आहेत. उर्वरीत देय शेतकर्यांना लवकरात लवकर देण्याचे निर्देश दिले आहेत.
आयपीएल साखर कारखाना सिसवा कडून गेल्या गाळप हंमागात एकूण 95.99 करोड रुपयांच्या ऊसाचे गाळप झाले होते. कारखान्याकडून पूर्वी शेतकर्यांना ऊस मूल्य 76 करोड 89 लाख 29 हजार रुपये दिले होते. कारखान्याने पुन्हा जवळपास 350 पेक्षा अधिक शेतकर्यांची तीन करोड 10 लाख रुपयांची थकबाकी भागवली आहे. कारखान्याकडून भागवण्यात आलेल्या थकबाकीमुळे 31 मार्च पर्यंत ऊसाचा पुरवठा करणार्या शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे, तर अजूनही जवळपास 16 करोड रुपयांची शेतकरी वाट पाहात आहेत. जिल्हा ऊस अधिकारी जगदीश चंद्र यादव यांनी सागितले की, सिसवा कारखान्याकडून ऊस शेतकर्यांचे पैसे भागवणे सुरु आहे. जसजशी साखर विकली जात आहे, तसतसे शेतकर्यांना त्यांचे पैसे दिले जात आहेत. कारखाना व्यवस्थापनालाही नियमितपणे पैसे भागवणे व शेतकर्यांना दिलासा देण्याचे निर्देश दिले गेले आहेत.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.