साखर कारखान्याचे संविदा आणि दैनिक वेतन कर्मचार्‍यांना केले धरणे आंदोलन

कायमगंज: वेतनाचे असमान वितरण आणि इतर समस्यांबाबत सहकारी साखर कारखान्याचे संविदा आणि दैनिक वेतन भोगी कर्मचार्‍यांनी कारखाना गेट वर धरणे आंदोलन केले.

सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगामात कार्यरत संविदा कर्मचारी आणि दैनिक वेतन भागी कर्मचार्‍यांनी साखऱ कारखाना गेटवर एकत्र येवून धरणे आंदोलन करुन विरोध दर्शवला. कर्मचार्‍यांनी सांगितले की, सेंवा आणि अटींबाबत काहीही नियम नाही, पगाराची निश्‍चिती नाही. कधीही कोणालाही कामावरुन काढले जाते, ज्याला हवे त्याला घेतले जाते. वर्षांपासून काम करणार्‍या जुन्या कर्मचार्‍यांना कारण नसताना काढण्यात आले आहे. पगार निश्‍चितीचा कोणताही नियम नाही. या समस्यांवर कर्मचार्‍यांनी तीन सूत्रीय मागणी पत्रासह जीएस यांच्याशी चर्चा करुन निवेदन दिले.

कर्मचार्‍यांनुसार, जीएम यांना पाच दिवसांमध्ये समस्यांच्या निराकरणाचे आश्‍वासन दिले आहे. जीएम किशनलाल यांनी संगितले की, कर्मचार्‍यांचा पगार साखर कारखाना संघ मुख्यालयातून निश्‍चित केला जातो. कर्मचार्‍यांच्या मागणीला संघ मुख्यालयात पाठवले जाईल. तिथून जसे निर्देश मिळतील त्या आधारावर कारवाई केली जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here