ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नोंदणीतील त्रुटी सुधारण्याची संधी

महराजगंज : जिल्ह्यातील ऊस सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. ऊस विभागाने यापूर्वी साखर कारखाने आणि ऊस विभागाच्यावतीने करण्यात आलेल्या संयुक्त सर्वेक्षणातील त्रुटी सुधारण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, ऊस विभागाने साखर कारखान्यांना गावागावात जावून उसाच्या नोंदणीचे सादरीकरण करण्यास सांगितले आहे. त्यानुसार ही मोहीम सुरू आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना आपल्या ऊस लागवड क्षेत्राच्या नोंदीची पडताळणी करण्यात येणार आहे. यामध्ये जर एखादी त्रुटी आढळली तर त्याचे जाग्यावरच निराकरण करता येईल. शेतकऱ्यांनी ही पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन ऊस विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here