ओंगोल : राज्य नागरी पुरवठा विभागाने बीपीएल (दारिद्रयरेषेखालील) कुटुंबांना डिसेंबर २०२२ च्या मासिक रेशनसोबत साखर आणि डाळीचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. ख्रिसमस आणि संक्रांतीचा सण जवळ आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. मोबाईल डिस्पेंसिंग युनिटच्या (एमडीयू) संचालकांच्या माध्यमातून राज्यातील पांढऱ्या रेशन कार्डधारकांना तीन महिन्याच्या कालावधीनंतर घरपोच साहित्य पुरवठा केला जात आहे. अधिकृत माहितीनुसार, जिल्ह्यातील जवळपास .५५ लाख कुटुंबे रेशन कार्डधारक आहेत. त्या सर्वांना सवलतीच्या दरात ५ किलो तांदूळ, डाळ, साखर दिली जाणार आहे. ते यासाठी पात्र आहेत.
यापूर्वी सरकारकडून सर्व रेशन कार्डधारकांना सवलतीच्या दरात तांदूळ, डाळ, साखर, तेल आदी साहित्य दिले जात होते. हळूहळू विभागाने सवलतीच्या दरात दिल्या जाणाऱ्या वस्तूंची संख्या कमी केली होती. आता नागरी पुरवठा विभाग ६७ रुपये किलो दराने एक किलो डाळ आणि १७ रुपये किलो दराने अर्धा किलो साखर उपलब्ध करून देणार आहे. जिल्हाभरात एमडीयूच्या माध्यमातून घरोघरी वितरण सुरू झाले आहे. उर्वरीत डाळीचा साठाही आम्ही प्रत्येक ठिकाणी पोहोचवू. त्याचे रेशन कार्डधारकांना वितरण केले जाईल असे सांगण्यात आले.