बांगलादेशमध्ये व्यापाऱ्यांकडून साखरेची दरवाढ

ढाका : बांगलादेशातील व्यापाऱ्यांनी साखरेच्या किमती वाढवल्या असल्याचे वृत्त प्रसार माध्यमांनी दिले आहे. मात्र याबाबत वाणिज्य मंत्रालयाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. सरकारने किमती वाढवण्यास सहमती दिल्यानंतर या महिन्याच्या सुरुवातीला रिफायनर्सनी साखरेच्या दरात प्रती किलो १३ टीके दरवाढीचा प्रस्ताव दिला होता. उत्पादनासाठी गॅसचा तुटवडा आणि आयातीसाठी डॉलरची वाढलेली किंमत असे कारण देत रिफायनरींनी दरवाढीसाठी प्रस्ताव दिला. त्यांच्या या प्रस्तावावर मंत्रालयाकडून कोणतेही अधिकृत निवेदन आलेले नाही. त्यामुळे त्यांनी गुरुवारी वाढीव दराने उत्पादनाचा पुरवठा सुरू केला आहे. कारवा बाजार येथे रविवारी पॅकबंद साखर १०८ टीके प्रती किलो दराने विकली जात होती.

किरकोळ विक्रेत्यांनी पुरवठ्याच्या तुटवड्यामुळे स्टॉकची कमतरता असल्याचे सांगून आधीच किमती वाढवल्या आहेत. किरकोळ व्यापाऱ्यांच्या मते, रिफायनर्सनी किमती वाढवल्या. पण किरकोळ विक्रेत्यांसाठी नफ्याचे मार्जिन कमी केले आहे. एक किलो साखर विकून आम्हाला फक्त दोन टीके नफा मिळत आहे. राष्ट्रीय ग्राहक हक्क संरक्षण संचालनालयाचे प्रमुख ए. एच. एम. शफीकझमान म्हणाले की, कंपन्या किंवा त्यांच्या संघटनांना कायद्यान्वये तेल आणि साखरेच्या किमती निश्चित करण्याची परवानगी देत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here