बिहार : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल २० रुपये जादा मिळणार

पाटणा : यंदाच्या, २०२४-२५ च्या ऊस गाळप हंगामापासून पूर्वनिर्धारित ऊसाच्या किमतीत प्रति क्विंटल १० रुपयांची वाढ जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी प्रगती यात्रेत केलेल्या घोषणेच्या अंमलबजावणी सुरू झाल्याने राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती मजबूत झाली आहे. या वाढीनंतर, अंदाजे फरकाची रक्कम ७० कोटी रुपये होईल, जी दरवर्षी राज्य सरकारकडून भरली जाईल. या योजनेअंतर्गत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गेल्यावर्षीपेक्षा २० रुपये प्रति क्विंटल जास्त उसाचा दर मिळेल असे सूत्रांनी सांगितले.

साखर कारखाने बंद झाल्यानंतर ७ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा केले जातील, असे सांगण्यात आले आहे. शेतकऱ्यांना पैसे देण्याची प्रक्रिया २७ फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. विविध साखर कारखान्यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण ५,३६,८४,५१६ रुपये जमा झाले आहेत. कारखान्यांनी लवकरात लवकर पैसे द्यावेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here