बजेटनंतर शेतकऱ्यांचे उत्पन्न होणार दुप्पट, पीएम किसान योजनेच्या रक्कमेत वाढीचा प्रस्ताव

नवी दिल्ली : पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा करू शकते. केंद्र सरकार आपल्या दुसऱ्या कार्यकाळातील पाचवा अर्थसंकल्प लवकरच सादर करणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या उत्पन्नाबाबत, पीएम किसान योजनेच्या हप्त्यांसंदर्भात मोठी घोषणा होईल अशी अपेक्षा आहे. कोरोना संक्रमणाच्या काळात अडचणीत आलेल्या अर्थव्यवस्थेदरम्यान, या वर्षीचा अर्थसंकल्प शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे.

याबाबत, झी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, महागाईने त्रस्त झालेल्या लोकांना यंदाच्या बजेटकडून खूप अपेक्षा आहे. त्यातच केंद्रातील मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान योजनेच्या निधीबाबत मोठी घोषणा करू शकते असे सांगितले जात आहे. जर तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल तर तुमचे उत्पन्न दुप्पट होवू शकते. केंद्र सरकार बजेट २०२३ मध्ये पीएम किसान सन्मान योजनेतून मिळणाऱ्या वार्षिक ६,००० रुपयांचा लाभ वाढविण्याबाबत घोषणा करू शकते. योजनेतील लाभ वाढवावा अशी मागणी यापूर्वीही अनेकदा करण्यात आली आहे. २०२२ मध्येही शेतकऱ्यांनी या योजनेचा हप्ता वाढवावा अशी मागणी केली होती. मात्र, आता बजेटमध्ये याची घोषणा होईल असे शेतकऱ्यांना वाटते. योजनेत ६ हजारांऐवजी ८ हजार रुपये दिले जाऊ शकतात. शेतकऱ्यांना २००० रुपयांचे ३ ऐवजी ४ हप्ते दिले जावू शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here