छत्तीसगढ : ऊस बिले न दिल्यास साखर कारखान्याला घेराव घालण्याचा निर्णय

कबीरधाम: समृद्ध छत्तीसगड किसान संघाने आयोजित केलेल्या बैठकीत पंढरियातील नवीन साखर कारखान्याला घेराव घालण्याचा निर्णय घेण्यात आला. साखर कारखान्याकडून ऊस बिले देण्यास विलंब होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. किसान संघाचे जिल्हाध्यक्ष सोनी वर्मा म्हणाले कि, पंढरीया विभागातील पदाधिकाऱ्यांनी तिलाईभाथ गावातील बैठकीत शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर चर्चा केली. पंढरियातील नवीन साखर कारखान्याने ऊस बिले, बोनस द्यावा, यासाठी कारखान्याच्या कार्यकारी संचालकांना निवेदन देण्यात आले. कारखाना व्यवस्थापनाने मागण्यावर त्वरित निर्णय न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here