छत्तीसगढ : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार २५ कोटी रुपये बोनस

कबीरधाम : भोरमदेव सहकारी साखर कारखान्याला ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना अद्याप बोनस मिळालेला नाही. बोनससह शेअर हस्तांतरण आणि इतर समस्यांबाबत समृद्ध छत्तीसगड किसान युनियनच्या प्रतिनिधींनी कारखान्याचे एमडी भूपेंद्रसिंह ठाकूर यांच्याशी चर्चा केली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. कारखान्याला ऊस पुरवठा करणाऱ्या ११ हजार ८३६ भागधारक शेतकऱ्यांना बोनस म्हणून २५ कोटी रुपये मिळणार असल्याचे सांगण्यात आले.

भास्करमध्ये प्रकाशित वृत्तानुसार कारखान्याचे एमडी भूपेंद्रसिंह ठाकूर यांनी सांगितले की, राजीव गांधी न्याय योजनेत समायोजन केल्यानंतर बोनसची रक्कम दिली जाईल. शासनाला याच्या मागणीचे पत्र पाठविण्यात आले आहे. शेतकऱ्यांना १५ दिवसांत पैसे देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. गेल्या हंगामात भोरमदेव कारखान्याला ११,८३६ शेतकऱ्यांनी ३,४३,८३३ मेट्रिक टन ऊस पाठवला होता. त्यासाठी  शेतकऱ्यांना प्रती क्विंटल २८२ रुपये दर देण्यात आला आहे. उर्वरित बोनसची रक्कम ७२.८८ रुपये प्रती क्विंटल दराने शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. एकूण २५ कोटी रुपयांचा बोनस दिला जाणार आहे, असे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here