पटना: बिहारमधील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. नितीशकुमार यांच्या सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आता इनपुट अनुदान मिळणार आहे. कृषी विभाग परिस्थितीचा आढावा घेणार आहे. नुकसान किती झाले आहे हे लक्षात घेऊन भरपाई दिली जाईल. उसाची शेती ऊस उद्योग विभागाच्या नियंत्रणाखाली होती. सरकारच्या या निर्णयामुळे तीन हेक्टरवर ऊस शेती पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
कृषी सचिव डॉ. एन. सर्वच कुमार यांनी याचे आदेश जारी केले आहेत. त्यांनी सर्व कृषी अधिकाऱ्यांना पूर, अतिवृष्टी, दुष्काळ, इतर नैसर्गिक आपत्ती यात शेतीच्या होणाऱ्या नुकसानीचा आढावा घेण्यास सांगण्यात आले आहे. ऊस पिकाच्याही नुकसानीचा अंदाज घ्या अशा सूचना आहेत. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नियमानुसार कृषी इनपुट अनुदानाचा लाभ मिळेल.
कृषी सचिवांनी सांगितले की, धान्य आणि इतर पिकांप्रमाणे ऊस हे नकदी पिक आहे. सुमारे तीन लाख हेक्टर क्षेत्रावर त्याची लागवड केली जाते. सर्वाधिक ऊस पश्चिम चंपारण, सीतामढी, गोपालगंज आणि मुझफ्फरनगर जिल्ह्यात पिकतो. पूर अथवा दुष्काळ पडला तर इतर पिकांना भरपाई मिळते. उसाचे तसे होत नाही. त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link