महाराष्ट्रात १९३ साखर कारखान्यांकडून गाळप सुरू

महाराष्ट्रात २०२१-२२ या हंगामामध्ये मोठ्या प्रमाणावर साखर कारखान्यांनी सहभाग घेतला आहे. साखर आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार हंगाम २०२१-२२ मध्ये २० जानेवारी २०२२ अखेर महाराष्ट्रात एकूण १९३ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. यामध्ये ९६ सहकारी आणि ९७ खासगी साखर कारखान्यांचा समावेश आहे. आतापर्यंत ६३३.७७ लाख टन ऊसाचे गाळप करण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत ६२९.८२ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा ९.९४ टक्के आहे.

राज्यात सर्वाधिक साखर कारखाने सोलापूर विभागात कार्यरत आहेत. सोलापूरमध्ये सर्वाधिक ४५ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. येथे २० जानेवारी २०२२ अखेर १५०.५६ लाख टन उसाचे गाळप करून १३४.९६ लाख क्विंटल साखर उत्पादन केले आहे.

राज्यात सर्वाधिक साखर उत्पादन कोल्हापूर विभागात झाले आहे. कोल्हापूर विभागात आतापर्यंत १५२.२१ लाख टन उसाचे गाळप करून १७२.२९ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. येथील साखर उतारा ११.३२ टक्के आहे.

पुणे विभागात हंगाम २०२१-२२ मध्ये २० जानेवारी २०२२ पर्यंत एकूण २९ कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. यामध्ये १६ सहकारी तर १३ खासगी कारखान्यांचा समावेश आहे. आतापर्यंत १२८.५१ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. पुणे विभागात १३०.०६ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. पुणे विभागाचा सरासरी साखर उतारा १०.१२ टक्के आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here