आयकर रिटर्न भरण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

नवी दिल्ली : 2018-19 या अर्थिक वर्षातील आयकर परतावा भरण्याची मुदत सरकारने दि. 31 ऑगस्ट पर्यंत वाढवली आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयानुसार, करदात्यांच्या आर्थिक श्रेणीचा विचार करुन केंद्रीय कर मंडळाने कर परतावा भरण्याची मुदत 31 जुलै 2019 ते 31 ऑगस्ट 2019 पर्यंत वाढवली असल्याचे सांगितले.

2018-19 च्या आर्थिक वर्षातील टीडीएस जारी करण्यास विलंब झाल्यामुळे आयटीआर भरण्याच्या मुदतीतही वाढ करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. आयकर विभागाने गेल्या महिन्यात नियतकालिकांसाठी 10 जुलैपर्यंत मुदत वाढविली होती. उर्वरीत पगारदार करदात्यांना आयकर परतावा दाखल करण्यासाठी फक्त 20 दिवस दिले राहिलेत.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here