नजीबाबाद : साखर कारखाना व्यवस्थापन समितीच्या शिष्टमंडळाने साखर कारखाना संघाचे कार्यकारी संचालक रमाकांत पांडे यांची लखनौमध्ये भेट घेवून निवेदन दिले. थकीत ऊस बिले देण्यासाठी कारखान्यांच्या गोदामांतील साखरेची विक्री करण्याची मागणी त्यांनी केली. नजीबाबाद शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे उपसभाती लोकेंद्र सिंह चौधरी, संचालक पितांबर सिंह यांनी लखनौत साखर कारखाना संघाचे कार्यकारी संचालक रमाकांत पांडे यांची भेट घेतील. कारखान्यांच्या गोदामांतील लाखो क्विंटल साखरेची विक्री झाली नसल्याने शेतकऱ्यांची ऊस बिले थकीत असल्याची वस्तूस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली.
अमर उजालामधील वृत्तानुसार, शिष्टमंडळाने साखर कारखान्याच्या गोदामातील पाच लाख क्विंटल तर इतर बाहेरच्या गोदामांतील १.५ लाख क्विंटल साखरेचा साठा शिल्लक असल्याची माहिती दिली. गळीत हंगाम संपून सात महिने उलटले तरी शेतकऱ्यांची ऊस बिले प्रलंबित असल्याचे त्यांनी सांगितले. तातडीने या साखरेची विक्री करावी आणि शेतकऱ्यांना पैसे द्यावेत अशी मागणी करण्यात आली. नवा हंगाम सुरू होत असला तरी आधीची बिले न मिळाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे असे सांगण्यात आले. यावेळी रमाकांत पांडे यांनी लवकरच बिले दिली जातील असे आश्वासन दिले.