खरीप पिकाचे मोसमी पावसावरचे अवलंबित्व हळूहळू कमी होतेय

नवी दिल्ली : मान्सूनच्या पावसावरील खरीप पीक उत्पादनाचे अवलंबित्व हळूहळू कमी होत आहे असे इंडिया रेटिंग्स अँड रिसर्च (Ind-Ra) ने केलेल्या विश्लेषणात आढळून आले आहे. पारंपारिकपणे, भारतीय शेती, विशेषतः खरीप क्षेत्र/उत्पादन हे मान्सूनच्या पावसाच्या सामान्य प्रगतीवर अवलंबून असते. तथापि, देशात सिंचन सुविधांचा प्रसार झाल्यामुळे खरीप उत्पादनासाठी मान्सूनच्या पावसावर अवलंबून राहण्याची स्थिती हळूहळू सुधारत आहे. आता हे अवलंबित्व कमी होत आहे, असे Ind-Ra रेटिंग एजन्सीने म्हटले आहे.

याबाबतच्या ताज्या आकडेवारीनुसार, अखिल भारतीय स्तरावर सिंचनाची व्याप्ती १९९९-२० मधील ४१.८ टक्क्यांवरून २०२०-२१ मध्ये ५५.० टक्क्यांपर्यंत वाढली आहे. २०२४ साठी सामान्यापेक्षा जास्त नैऋत्य मोसमी पावसाच्या अनुमानामुळे निःसंशयपणे कृषी आणि ग्रामीण मागणीचा दृष्टिकोन बदलला आहे, असे इंड-रा येथील प्रमुख अर्थशास्त्रज्ञ सुनील कुमार सिन्हा यांनी सांगितले. तथापि, वर्षानुवर्षे दक्षिण-पश्चिम मान्सूनचा (जून-सप्टेंबर) बराचसा हंगाम असमान आहे.

या वर्षी नैऋत्य मान्सून (जून-सप्टेंबर) सामान्यपेक्षा जास्त असेल. हा दीर्घकालीन सरासरीच्या १०६ टक्के असेल असे आयएमडीने आपल्या पहिल्या दीर्घकालीन अंदाजात म्हटले आहे. दुसरीकडे स्कायमेटनेही या वर्षी सामान्य मान्सूनचा अंदाज वर्तवला आहे. याबाबत इंड-रा ने सांगितले की, हंगामाच्या दुसऱ्या आणि उत्तरार्धात ला निना आणि सकारात्मक हिंद महासागर द्विध्रुव परिस्थितीमुळे २०२४ मध्ये मॉन्सूनच्या सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल. नैऋत्य मान्सूनच्या कालावधीत भारतातील एकूण पावसाच्या ७० टक्क्यांहून अधिक पाऊस हा भारतीय अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचा आहे. कारण भारतातील सुमारे ४५ टक्के लोकांची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे.

आयएमडी २००३ पासून एप्रिलमध्ये नैऋत्य मोसमी पावसाचा पहिला टप्पा अंदाज जारी करते. पहिल्या टप्प्यातील अंदाज शेतकरी, धोरणकर्ते आणि गुंतवणुकदारांसाठी महत्त्वाचा आहे, ज्यांना आगामी खरीप हंगामासाठी आवश्यक तयारी करायची आहे, त्यांच्यासाठी या माहितीची आवश्यकता आहे. नैऋत्य मान्सून साधारणपणे एक जून रोजी केरळमध्ये सुमारे सात दिवसांच्या प्रमाण विचलनासह प्रवेश करतो.

विशेषतः पावसावर अवलंबून असलेल्या खरीप पिकांसाठी हा पाऊस महत्त्वाचा आहे. भारतात तीन पीक हंगाम आहेत. यात उन्हाळा, खरीप आणि रब्बी अशी विभागणी होते. ज्या पिकांची पेरणी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये केली जाते आणि परिपक्वतेवर अवलंबून जानेवारीपासून कापणी केली जाते, त्यांना रब्बी पिके म्हणतात. खरीप पिके जून-जुलैमध्ये पेरलेली आणि मान्सूनच्या पावसावर अवलंबून असलेली आहेत. ती पिके ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये काढली जातात. उन्हाळी पिके ही रब्बी आणि खरीप यांदरम्यान घेतली जाणारी पिके आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here