पुणे : लोणावळ्यानजीक मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे वरील एका पुलावर इथेनॉलचा टँकर उलटला. टँकर उलटल्यानंतर इथेनॉल सर्वत्र पसरून आग लागली. या आगीच्या विळख्यात सापडल्याने एकाच कुटूंबातील तीन जणांसह चौघांचा मृत्यू झाला. तर आणखी तिघे गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबत द इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, बुधवारी सकाळी साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यामधून इथेनॉल वाशी येथे नेण्यात येत होते. पोलिसांनी चालक नितीन सत्रे आणि ट्रक मालक काकडे याच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. (पूर्ण नाव उपलब्ध नाही) आतापर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. जखमी चालकावर उपचार सुरू आहेत. सकाळी ११.३० च्या सुमारास ही दुर्घटना घडली. त्यानंतर काही वेळातच आग लागली.