काठमांडू : साखर उत्पादकांनी सरकारकडून ऊस दरात वाढ केल्याचे कारण देत साखरेचे दरही वाढवले आहेत. साखर उत्पादांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी साखरेचा दर ७२-७६ रुपये प्रती किलोवरुन ८२ -९० रुपये (Nepalese Rupee) प्रती किलो करण्यात आला आहे. सुधारित दरानंतर एक किलो साखरेसाठी १०० रुपयांहून अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.
साखर कारखाने आपल्या उत्पादनांचा दर वाढविण्याचा निर्णय योग्य ठरवण्यासाठी ऊसाचा दर वाढविण्याचा सरकारच्या निर्णयाचा दाखला दिला आहे. सरकारने यावर्षी ऊसाचाकिमान दर ५९० रुपये (Nepalese Rupee) प्रती क्विंटल करण्यात आला आहे. हा दर गेल्या वर्षीच्या किमान दरापेक्षा ४५.६७ रुपये अधिक आहे. खरेतर कारखान्याच्या कच्च्या मालाचा दर किरकोळ वाढीनंतर तयार झालेल्या उत्पादनात १९ टक्क्यांपर्यंत दर वाढविण्यात आला आहे. कारखानदारांनी सांगितले की, एक क्विंटल उसापासून किमान नऊ किलो साखर उत्पादन घेण्यात आले आहे.