जिल्ह्यातील कारखान्यांनी मोडला ऊस गाळपाचा गेल्या हंगामाचा उच्चांक

बिजनौर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गेल्यावर्षीचा ऊस गाळपाचा उच्चांक मोडला आहे. जिल्ह्यातील सर्व ९ साखर कारखान्यांनी गेल्यावर्षी ११ कोटी ४४ लाख ७६ हजार क्विंटल ऊस गाळप केले होते. यंदा या कारखान्यांनी ११ कोटी ४५ लाख ३० हजार क्विंटल ऊस गाळप करून नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे.

जिल्ह्यात यंदा ऊसाचे उत्पादन कमी असल्याचे सांगितले जात होते. उत्पादन १५ टक्क्यांनी घसरण्याचा अंदाज होता. मात्र, कारखान्यांनी गेल्यावर्षीच्या गाळपाचा उच्चांक मोडून नवा विक्रम प्रस्थापित केला

धामपूर साखर कारखान्याने गेल्यावर्षीच्या २ कोटी ३१ लाख ६३ हजार क्विंटल गाळपाच्या तुलनेत यंदा २ कोटी ३८ लाख ९२ हजार क्विंटल उसाचे गाळप केले. स्योहारा कारखान्याने गेल्यावर्षी २ कोटी १४ लाख ५० हजार क्विटलच्या तुलनेत यंदा २ कोटी १८ लाख २५ हजार क्विंटलचे गाळप केले. बहादरपूर कारखान्याने गेल्यावर्षीच्या १ कोटी १९ लाख ४५ हजार क्विटंलच्या तुलनेत यंदा १ कोटी २७ लाख ९१ हजार क्विंटल, बरकातपूर कारखान्याने गेल्यावर्षीच्या १ कोटी ४१ लाख ३६ हजार क्विटंलच्या तुलनेत १ कोटी ४२ लाख ३८ हजार क्विंटल, तर बुंदकी कारखान्याने गेल्यावर्षीच्या १ कोटी २८ लाख १० हजार क्विटंलच्या तुलनेत १ कोटी २९ लाख ६२ हजार क्विंटल उसाचे गाळप केले.

याबाबत जिल्हा ऊस अधिकारी यशपाल सिंह म्हणाले, जिल्ह्यातील साखर कारखान्याने नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. गेल्यावर्षी ११ कोटी ४४ लाख ७६ हजार क्विंटल उसाचे गाळप झाले. यंदा ११ कोटी ४५ लाख ३० हजार क्विंटल उसाचे गाळप झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here