पैसे थकविणाऱ्या कारखान्याला ऊस न देण्याचा फरेंदाच्या शेतकऱ्यांचा निर्णय

महराजगंज : फरेंदा ऊस समितीच्या कार्यालयात ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बैठक झाली. फरेंदा ऊस समितीचे सध्याचे अध्यक्ष केशव कुमार पांडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांनी गडौरा साखर कारखान्याला ऊस न पाठविण्याचा निर्णय घेतला.

लाईव्ह हिंदूस्तानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, गडौरा साखर कारखान्याने शेतकऱ्यांना अद्याप गेल्या हंगामातील उसाचे पैसे दिलेले नाहीत. पैसे मिळाले नसल्याने शेतकऱ्यांच्या शेतीवर तसेच दैनंदिन जीवनावर परिणाम झाला आहे. जोपर्यंत थकीत बिले मिळत नाही, तोपर्यंत सिसवा आयपीएल कारखान्याला ऊस पाठविण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला. यामध्ये दरहटा, अमहवा आणि सिसवा या ऊस केंद्राचा समावेश आहे. कुनवार व सिधवानी सेंटरवर ऊस विक्री करणारे शेतकरी आपला ऊस पिपराइच साखर कारखान्याला देतील. बैठकीस संचालक संतराम यादव, हृदय पांडेय, चंद्रप्रकाश पांडेय, सीताराम चौधरी, श्यामदेव, राकेश चौधरी यांच्यासह ऊस उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here