लखनौमध्ये शेतकऱ्यांचा मोर्चा, ऊस संस्थेला घेराव घालण्यासाठी एकवटले शेतकरी

लखनौ : ऊसाची थकीत बिले, वीजमाफी यांसह अनेक मागण्यांसाठी शेतकरी ऊस संशोधन संस्था गाठली आहे. भारतीय किसान युनियन हरिनाम सिंह गटाचे कार्यकर्ते हे निषेध आंदोलन करीत आहेत. या अंतर्गत पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत आयुक्तांना निवेदन देण्यात येणार आहे. आपल्या मागण्यांवर सकारात्मक कार्यवाही न झाल्यास ५ कालिदास मार्गावर असलेल्या मुख्यमंत्री कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यातील शेतकरी ऊस संशोधन संस्थेत बसले आहेत.

किसान युनियनचे अध्यक्ष हरिनाम सिंह म्हणाले की, उसाच्या दरात प्रती क्विंटल ५० रुपयांची वाढ करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांची ऊस बिलेही अद्याप मिळालेली नाहीत. त्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. यात लवकरात लवकर बदल न केल्यास शेतकरी आंदोलन करण्याची भूमिका घेतील. याशिवाय शेतकऱ्यांसाठी अद्याप वीज पूर्णपणे मोफत झालेली नाही. शेतकऱ्यांना कूपनलिकांना मोफत वीज देण्याची चर्चा होती, मात्र राज्यात अनेक ठिकाणी ऊर्जा विभागाचे अधिकारी अद्यापही शेतकऱ्यांना त्रास देत आहेत असे शेतकऱ्यांनी सांगितले. नोएडामधील प्राधिकरण शेतकऱ्यांची आधी जमीन अधिग्रहित करते आणि नंतर शेतकऱ्याला त्याची माहिती देते. शेतकऱ्यांचे यापेक्षा मोठे शोषण काय असू शकते? असा आरोप त्यांनी केले.

साखर उद्योगाच्या बातम्यांबद्दल अधिक वाचण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here