साखर कारखानदारांविरोधात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू

मुंबई : महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात स्वाभीमानी शेतकरी संघटनेने साखर कारखानदार आणि सरकारविरोधात आंदोलन सुर केले आहे. उसाची एफआरपी मिळाली नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरच्या टायरची हवा सोडली. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये स्वाभीमानी शेतकरी संघटनेने अशा प्रकारची आंदोलने सुरू केली आहेत.

TV9 मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यानुसार, संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी सांगितले की, जोपर्यंत शेतकऱ्यांना एफआरपीअनुसार पैसे मिळत नाहीत, तोपर्यंत कारखान्यांना ऊस पाठवू देणार नाही. उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्र हे द्वितीय क्रमांकाचा ऊस उत्पादक राज्य आहे. मात्र, येथे शेतकऱ्यांना एफआरपी मिळालेली नाही. वेळेवर ऊस बिले मिळाली नसल्याने शेतकरी संतप्त आहेत.

कारखानदारांच्या भूमिकेमुळे संतप्त सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील सुस्ते गावातील शेतकरी विजय कुमार नागटिळक यांनी सांगितले की, जर एखाद्या कारखान्याने चौदा दिवसात सर्व शेतकऱ्यांना ऊस बिले अदा केली तर त्यांना एक एकर जमीन बक्षिस दिली जाईल.

केंद्र सरकारने ऑगस्ट महिन्यात एफआरपीमध्ये ५ रुपये प्रती क्विंटल वाढ करून २९० रुपये प्रती क्विंटल दर केला होता. दहा टक्के रिकव्हरीवर हा दर लागू होतो. कृषी मूल्य आयोगाकडून दरवर्षी याची शिफारस केली जाते. त्यानंतर केंद्र सरकार हा दर लागू करते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here