ऊस समित्यांमध्ये शेतकरी मेळाव्यांचे करणार आयोजन

बिजनौर : शेतकऱ्यांना त्यांच्या नवीन ऊस लागवड केलेल्या पिकाची व खोडवा पिकाची नोंदणी, लागवड क्षेत्र, तोडणी पावती आदींबाबत येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी ऊस समित्यांच्यावतीने शेतकरी मेळाव्यांचे आयोजन केले जाणार आहे. या मेळाव्यांना ऊस विभागाचे अधिकारी उपस्थित राहून शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करतील. आगामी ऊस हंगामासाठी विभागात जोरदार तयारी सुरू झाली आहे. त्याअंतर्गत विभागाने कार्यक्रमाचे नियोजन केले असून प्री-कॅलेंडरचे वितरण केले जात आहे. शेतकऱ्यांना हंगामात अडचणी येवू नयेत, यासाठी या मेळाव्यांचे आयोजन केले जाणार आहे.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, या शेतकरी मेळाव्यात शेतकऱ्यांची पिकाविषयक माहिती अपडेट आहे का, तसेच मोबाईल क्रमांक, लागवड क्षेत्र, कालावधी यातील अडचणी दूर केल्या जातील. ऊस समित्यांचे सचिव, ज्येष्ठ ऊस विकास निरीक्षक, ऊस पर्यवेक्षक, कर्मचारी यावेळी उपस्थित राहतील. शेतकऱ्यांना आपल्या तोडणी कार्यक्रम पत्रिकेत काही अडचणी दिसून आल्या तर त्याचे निराकरण केले जाईल. सर्व समस्या दूर करण्याचे नियोजन केले असल्याची माहिती जिल्हा ऊस अधिकारी पी. एन. सिंह यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here