साखर कारखान्याच्या थकबाकीप्रश्नी संतप्त शेतकऱ्यांचा सभात्याग

तंजावर : बँकेमध्ये परस्पर कर्ज उचलल्याच्या प्रकरणाकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांनी शुक्रवारी मासिक तक्रार निवारण बैठकीवर बहिष्कार घालत सभात्याग केला. अधिकाऱ्यांनी थिरुमन कुडी साखर कारखान्याबाबत शेतकऱ्यांचे मुद्दे ज्या पद्धतीने निकाली काढले, त्याबाबत नाराजी व्यक्त केली. बैठकीच्या सभागृहाबाहेर पडल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी दिनेश पोनराज ओलिव्हर आणि इतर अधिकारी बसलेल्या कक्षाला घेराव घातला.

आधीच्या व्यवस्थापनांकडून बँक अधिकाऱ्यांशी साटेलोटे करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या नावावर ३०० कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याच्या मुद्याला अधिकाऱ्यांनी अधिक महत्त्व दिलेले नाही. याबाबत संतप्त शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. कर्ज वसुलीच्या माध्यमातून व्यवस्थापनाने बदल करावा अथवा शेतकऱ्यांना कर्ज भरण्याबाबत दिलासा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. इतर कंपनी कायद्यातील तरतुदींचा विचार केला जावा अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. बहुतांश ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी खासगी व्यवस्थापनामध्ये बदलाचे समर्थन केले आहे. बैठक दुसऱ्यांचा सुरू झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी कारखाना कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना बिले अदा करेल असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here