रुडकी : थकीत ऊस बिलांच्या मागणीबाबत शेतकऱ्यांनी शुक्रवारी साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाशी दुसऱ्या फेरीतही चर्चा केली. यावेळी ऊस पुरवठा केल्यानंतर २० दिवसांत शेतकऱ्यांना बिले अदा करण्याचे आश्वासन कारखाना व्यवस्थापनाने दिले. शेतकरी व साखर कारखाना व्यवस्थापनाच्या दोघांनी सहमती दिली.
अमर उजालामधील वृत्तानुसरा, इक्बालपूर साखर कारखान्याकडे चालू ऊस गळीत हंगामातील शेतकऱ्यांची ऊस बिले गेले महिनाभर थकीत आहेत. ऊस पाठविल्यानंतर २० दिवसांत पैसे द्यावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी शुक्रवारी कारखान्याकडे केली. यावेळी प्रशासनाने सांगितले की, लवकरच त्यांच्या समस्या सोडविण्यात येतील. साखर विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहे. तिची विक्री झाली की लगेच बिले दिली जातील. यापूर्वी, बुधवारीही शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत पहिल्या टप्प्यात चर्चा केली होती. मात्र तोडगा निघाला नव्हता. शुक्रवारी चर्चेसाठी सोनू चौधरी, अरविंद सिंग, सागर सिंग, ईशा त्यागी, विजय त्यागी, अश्वनी चौधरी, दिलीप कुमार, पिंकी चौधरी, रुपसिंग आदी उपस्थित होते.