फिजीचा साखर उद्योग हा सर्वात महत्त्वाचा वारसा : साखर उद्योग मंत्री चरणजित सिंग

ऑकलंड : फिजीतील साखर उद्योग हा आमच्या कठीण परिश्रम करणाऱ्या कामगारांसाठी सर्वात मोठा वारसा आहे आणि त्यांचा सन्मान राखण्यासाठी हा उद्योग पुन्हा एकदा उभारण्याची गरज आहे, असे प्रतिपादन साखर उद्योग मंत्री चरणजीत सिंह यांनी केले. न्यूझीलंडमधील ऑकलंडमध्ये आयोजित एका समारंभात ते बोलत होते. ते म्हणाले की, कठोर परिश्रम करणारे कामगार आणि साखर उद्योग हे परस्परांचे अभिन्न अंग आहेत. मंत्री सिंह म्हणाले की, साखर उद्योगावर आमच्या कमीत कमी एक चतुर्थांश लोकांचे भवितव्य टिकून आहे. आम्ही साखर उद्योगाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करू.

त्यांनी उपस्थित लोकांना सांगितले की, आपल्या देशाला तुमची मदत आणि विचारांची कधी नव्हे इतकी मोलाची गरज आहे. आपला देश गैरव्यवस्थापन, भ्रष्टाचार आणि अव्यवस्थेने दरवर्षी कोट्यवधी रुपयांची संपत्ती नष्ट करीत आहे. आपल्या कष्टकरी लोकांनी ही संपत्ती उभारली आहे. आणि तो आपला वापरा आहे. आपण या संसाधनांना सुरक्षित ठेवणे हे आपले कर्तव्य आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here