माजी आमदार यांनी केली ऊस थकबाकी भागवण्याची मागणी, एसडीएम यांना दिले निवेदन

मवाना: माजी आमदार मंत्री प्रभुदयाल वाल्मीकि यांनी गुरुवारी तहसील येथे पोचून धरणे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांशी चर्चा केली. यानंतर त्यांनी ऊस थकबाकी भागवणे व इतर समस्यांबाबत एस डी एम यांच्याशी चर्चा करुन निवेदन दिले. त्यांनी वेळेवर ऊस थकबाकी न भागवल्याने आंदोलनाचा इशारा दिला.

निवेदनात सांगितले की, मवाना साखर कारखान्याकडून अजून करोडो रुपयांचे देय बाकी आहे. पैसे वेळेत न मिळाल्याने शेतकऱ्यांची अवस्था खराब आहे. भाजप सरकारमध्ये करण्यात आलेल्या एकाही अश्वासनाावर प्रशासन काम करत नाही. त्यांनी लवकरच शेतकऱ्यांचे देय भाागवण्याची मागणी केली आहे. त्यांनी सांगितले की, जर शेतकऱ्यांंना थकबाकी लवकर दिली नाही तर सपाई रस्त्यावर उतरुन शेतकऱ्यांबरोबर साखर कारखान्याला घेराव घालणार. यावेळी कृष्ण कुमार यादव, अवधेश शर्मा, कंबर जैदी, महा सिंह, कमल सिंह चौहान आदि उपस्थित होते. तर किसान एकता संघर्ष समिति चे अध्यक्ष शौकीन गुर्जर यांच्या नेतृत्व मध्ये शेतकऱ्यांनी तहसील परिसर मध्ये घोषणा केल्या. धरणे आंदोलन समाप्त केल्यानंतर एसडीएम यांच्याकडे साखर कारखाना अधिकाऱ्यांविरोधात कार्रवाई करुन थकबाकी भागवण्याची मागणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here