हरियाणामध्ये साखर रिकवरी वाढवण्यावर जोर

चंदीगढ: हरियाणाचे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री जेपी दलाल यांनी सांगितले की, गाळप हंगाम 2020-21 साठी राज्यभरातील सर्व साखर कारखान्यांसाठी 754 लाख क्विंटल उसाचे गाळप करण्याचे लक्ष्य ठेवले आहे, जे गेल्या गाळपाच्या तुलनेत अधिक आहे. 2019-20 हंगामामध्ये जवळपास 702 लाख क्विंटल उसाचे गाळप करण्यात आले होते. त्यांनी सांगितले की, राज्याच्या सर्व सहकारी साखर कारखान्यांना निश्‍चित केलेल्या तारखेनुसार गाळप हंगाम सुरु करण्याचे निर्देेश देण्यात आले आहेत.

राज्यामध्ये साखर रिकवरी वाढवण्यावर जोर देण्यात आला आहे. मंत्री जे पी. दलाल रविवारी हरियाणा राज्य उस नियंत्रण बोर्डॉच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. त्यांनी पुढे साखर रिकवरी वाढवण्यासाठी सुचना प्रस्तुत करण्याचे निर्देश दिले, जेणेकरुन राज्यातील इतर साखर कारखान्यांना साखर रिकवरी टक्का वाढवण्यासाठी आवश्यक पावले उचलली जावू शकतील. बैठकीमध्ये, त्यांनी पुढे सांगितले की, 2020-21 गाळप हंगामादरम्यान राज्यातील तीन सहकारी सागर कारखाने, अर्थात, पलवल, महम आणि कैथल ला परीक्षणाच्या आधारावर साखरेसह उच्च दर्जाच्या गुळाचे उत्पादन करण्यासाठी निर्देशित करण्यात आले आहे

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here