हरियाणा: उच्च साखर उताऱ्यासह कारखान्याची राज्यात पाचव्या क्रमांकावर झेप

सोनीपत : आहुलाना साखर कारखान्यात २४ लाख क्विंटल ऊस गाळप करण्यात आले आहे. साखर कारखाना ९.६ टक्के साखर उताऱ्यासह राज्यात पाचव्या क्रमांकावर आहे. साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आशिष वशिष्ठ यांनी अधिकाऱ्यांना उतारा वाढविण्यासह शेतकऱ्यांना स्वच्छ ऊस पुरवठा करण्यापर्यंत सर्व बाबींसाठी प्रोत्साहन दिले आहे. साखर कारखान्याचे गाळप नोव्हेंबर महिन्यात सुरू झाले. हंगामात कारखान्याने ४८ लाख क्विंटल ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी कारखाना पूर्ण क्षमतेने चालविला जात आहे.

भास्करमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, साखर कारखान्यात दररोज २५ हजार क्विंटल उसाचे गाळप सुरू आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, साखर उतारा ९.६ टक्के आहे. उतारा वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना साफ व ताजा ऊस कारखान्याला पाठविण्याचे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे. केन व्यवस्थापक मंजीत दहिया यांनी सांगितले की, जर ऊस ताजा आणि स्वच्छ असेल तर साखर उतारा वाढू शकतो. साखर उतारा वाढल्यास कारखाना आणि शेतकरी दोघांचाही फायदा होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here