चंडीगढ : राज्य सरकारकडून राज्यातील साखर कारखान्यांमध्ये विविध योजना राबवून कारखान्यांची आर्थिक स्थिती सुधारण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती हरियाणाचे सहकार मंत्री बनवारी लाल यांनी दिली. या विविध योजनांच्या माध्यमातून जेव्हा साखर कारखान्यांची आर्थिक स्थिती मजबूत होईल, तेव्हा ऊस उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पिकांची बिले वेळेवर मिळू शकतील असे मंत्र्यांनी यावेळी सांगितले.
ते म्हणाले की, सरकारने सर्व सहकारी साखर कारखान्यांच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बिले दिली आहेत. आणि अशा शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर पैसे जमा करण्यात आले आहेत. सहकार मंत्री बनवारी लाल यांनी सोमवारी शाहबाद सहकारी साखर कारखाना लिमिटेडमध्ये ६० KLPD क्षमतेच्या इथेनॉल प्लांटमध्ये उत्पादन करण्यात आलेल्या इथेनॉलच्या विक्रीचे उद्घाटन केले. यावेळी मंत्री बोलत होते.