हरियाणा : शेतकऱ्यांना उसापासून जादा उत्पन्न मिळविण्याबाबत मार्गदर्शन

कॅथल : सहकारी साखर कारखान्याच्या वतीने बुधखेडा, दायोरा, संपन खेडी, संधौला-संधौली, मेघा माजरा येथे ऊस विकास व जलसंधारण चर्चासत्र आयोजित करण्यात आले. व्यवस्थापक ब्रह्म प्रकाश यांच्या निर्देशानुसार आयोजित या मेळाव्यांमध्ये ऊस व्यवस्थापक डॉ. रामपाल यांनी शेतकऱ्यांना ऊस लागवडीबद्दल मार्गदर्शन केले.

‘अमर उजाला’मध्ये प्रकाशित वृत्तानुसार डॉ. रामपाल म्हणाले कि, शरद ऋतूमध्ये सप्टेंबर-ऑक्टोबर या काळात ऊस पीक वसंत ऋतूमध्ये पेरलेल्या उसापेक्षा २०-२५ टक्के अधिक उत्पादन देते. हा ऊस कोणताही दुष्परिणाम न होता लवकर पक्व होतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न दीड ते दोन पटीने वाढू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी या कालावधीत उसाची लागवड करावी, असे सांगण्यात आले. उसाची लागवड करताना ती पूर्व-पश्चिम दिशेला करावी. उसात मोहरी, वाटाणा, बटाटा, कांदा, लसूण, मेथी, धने, मूग, उडीद आणि गहू ही पिके सहज घेता येतात. ऊसाचा किंवा आंतरपिकांचे उत्पादनावर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. लसूण, धने आणि कांदा यांसारखी पिके उसामधील टॉप बोरर आणि इतर किडींचा प्रादुर्भाव कमी करतात, असेही डॉ. रामपाल यांनी स्पष्ट केले.

उसामधील अंतर पिकांमुळे जमिनीची प्रत सुधारते आणि उत्पादन खर्चही तुलनेने कमी राहतो, असे त्यांनी सांगितले. यावेळी शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचन पद्धतीबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी ऊस मार्केटिंग अधिकारी डॉ. देशराज, रामपाल तंवर, सुलतान सिंग, राजवीर सिंग, दिलावर सिंग, बलकार सिंग, राजेशकुमार आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here